पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भेटूया ब्रेक के बाद

     आता कदाचित ३ महिने तरी मी लिहिणार नाही. अगदी प्रणच केलाय तसा मी. फार धकाकीचे, धावपळीचे, त्रासाचे, तणावाचे,जे जे वाईट प्रकारात मोडते तश्या प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे मी या तीन महिन्यांत. त्यामुळे लिहायला वेळच मिळणार नाही. कदाचित मी मार्चपासून परत लिहिणे चालू करेन. आणि हो, मी इतर ब्लॉग्स पण वाचणार नाही, त्यामुळे माझ्या प्रतिसादला तुम्ही मुकणार खरे! मी परत आल्यावर सगळा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करेन.तीन - सव्वातीन महिन्यांत ब्लॉगविश्वात किती बदल होतात ते बघणे मजेदार ठरेल.   आपल्या शुभेच्छा घेऊनच जायचा विचार आहे.विसरू नका मला! ;)   जाता जाता एक चारोळी लिहूनच जातो,सॉरी येतो ! ;)                       वाटेवरल्या सावल्या,                       मला विचारत्या झाल्या,                       माहीत आहे का तुला,                       कोणी सोडले आम्हाला ?    चला तर मग,राम राम!! रजनी रजनी !! भेटूच!!                                    

नया सूरज

 आज फिर धूप में चलें एक नये सूरज के तले ना कोई सीमा हो और`ना हो कोई बंधन हर घर अपना हो हर कोई हो स्वजन रंग रूप भाषा ना छले एक नये सूरज के तले द्वेष ना किसीके प्रति हर मन हो निर्मल भय में ना कोई जीएँ नेत्र ना कोई सजल प्रेम ही हर मन में पले एक नये सूरज के तले आशाओं के बादल संभावनाओं के सागर भरी रहें हर पल खुशियों की हर गागर ना हो हम संपूर्ण भले एक नये सूरज के तले ---नागपुर, २३-०२-२०१०

पाडाडी - कैपाक(कैच्याकै पाडलेली कविता)

     आम्ही यापूर्वी आपणांस यपाक व गपाक या दोन पाडकृती कृतीसकट दिलेल्या आहेत.तसेच यपाकपासून सायपाक कसे तयार करावे तेदेखील सांगितले.आता आम्ही ज्या पाडाडीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे "कैपाक" म्हणजेच "कैच्याकै पाडलेली कविता" .      कैपाक हा तसा बर्‍यापैकी लोकप्रिय असलेला प्रकार आहे. कैपाक करण्यात अगदीच पारंगत असलेले एक कैपाडे म्हणजे " मन्नू चलिक" हे होत. आपल्या कैपाकाने ते सातत्याने श्रोत्यांचे मनोरंजन करत असतात. मात्र त्यांनी कैपाकाची ही दीक्षा आमच्याकडूनच घेतली आहे हे आम्ही नमूद करू इच्छितो. अजून दुसरे  कैपाडे म्हणजे मर्‍हाटी मुलुखात गाजत असलेले हास्य-द्रुतवाहनाचे कवीराज होत.हे आमच्या नकळतच कैपाक बनवत असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कैपाक तितकेसे प्रभावी नसतात.त्यामुळे तुम्हालादेखील कैपाडे बनावयाचे असल्यास आमच्याकडे दीक्षा घेणेच योग्य ठरेल.    कैपाक ही यपाकचेच छेटे रूप आहे. इथेसुद्धा यमकाचे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. मात्र यपाक आणि कैपाकमधे काही मूलभूत फ़रक आहेत. १. कैपाक ही कितीही ओळींची, कुठल्याही विषयावरून कुठल्या

पाडाडी - कविता कशा पाडाव्या ??

       "पाडकृती" किंवा ज्याला सामान्यजन "पाडाडी" म्हणतात अशा वर्गीकृत केलेले अनेक जिन्नस आहेत .बुंदी पाडणे, विटा पाडणे, मुख्यमंत्री पाडणे, मंत्री पाडणे,आमदार- खासदार पाडणे,सरकार पाडणे, प्रेमात पाडणे , ब्लॉ ग पाडणे,लेख पाडणे, शब्द पाडणे(ही कृती आमचे  मित्र श्री. सत्यवान वटवटे उत्कृष्ट पाडतात. ते सातत्याने नवीन शब्द पाडत असतात.उदाहरणांसाठी त्यांचा  ब्लॉ ग तपासावा. ) अशा अनेक पाडाडी लोकप्रिय आहेत.पण कविता पाडणे ही नाविन्यपूर्ण पाडकृती आम्ही सर्वप्रथम निर्मिली. आमच्या स्नेह्यांना आम्ही ही पाडकृती चाखायला दिल्यावर अनेकांना प्रचंड आवडली. त्यांपैकी एक स्नेही कवी ता. पाडे यांना आम्ही त्याची कृतीही लिहून दिली.मग त्यांनी कविता पाडण्याचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला जो छान चालतही आहे.त्यांच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छादेखील आहेत.      मात्र कविता पाडण्याचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि ते trade secrete आम्ही कुणाला देणार नाही अशी एक भावना त्यांच्यात बळावत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच आमच्या पाडलेल्या कविता सर्वोत्कृष्ट असतात ही त्यांची दर्पोक्त

एक पाडलेली कविता-बाबा बोंगाळे महात्म्य !

आता या ६ तारखेला, जाम बोर मारत होतं.मग सौरभला पिंग टाकली. त्याला  सहजच म्हटले ," एखादा विषय सुचव, मग त्यावर मी कविता पाडतो. " पठ्ठ्याने विषय सुचवला " सौरभ महात्म्य !" हा स्वतःची महती वाचायला उत्सुक होता तर !! मी विचार केला, "कविता तर "पाडायचीच" आहे, मग विषयाचे काय tension घ्यायचे ! यमकाला यमक जुळवून पाडायला सुरुवात करू या की ! तसेही  उसाच्या I .T . मळ्यात काम करणारया आपल्या या मित्राबद्दल चार ओळी खरडायचे मनी होतेच. मग काय, लागलो आम्ही  कविता पाडायला!!!(हा शब्द आला की मला उगाचच एका "सुगंधी पार्श्वक्रियेची" आठवण येते.)१२ मिनटात कविता टायपून तयार !!! इशारा :-    १. ही कविता निखळ मनोरंजनाच्या हेतूने जाणीवपूर्वक "पाडलेली" आहे, उगाचच साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये. २ .इथे व्यक्त केलेल्या मताशी कवी सहमत असेलच असे नाही. इथे ओळी फक्त पाडल्या आहेत, कवीच्या भावना,मत वगैरे संवेदनशील गोष्टींना यात थारा नाही. ३. ही कविता सौरभच्या अनुमतीने प्रकाशित करण्यात येत आहे. चारित्र्यहनन वगैरे झाले म्हणून सौरभच्या वतीने स

Rajinikanth's Law of Conservation of Energy

conventioal Law of Conservation of Energy :- the energy can neither be created nor destroyed but can be transformed from one form to another... Rajinikanth's Law of Conservation of Energy :- " Rajinikanth can create as well as destroy energy "!!

जॉनी ऍपलसीड

    लहान असतांना "The Wonderworld of Science" या पुस्तकाचे मराठी अनुवाद "विज्ञानाचे नवलपरीचे जग" वाचले होते,नक्की कोणता भाग ते आठवत नाही.हे पुस्तक मला जाम आवडायचे. कित्येकदा पारायणे केली असतील. खरं तर मी लिहिणे-वाचणे शिकल्यावर वाचलेल्या पहिल्या ५ पुस्तकांतले एक म्हणजे हे पुस्तक.लहान मुलांना लक्षात ठेवूनच लिहिलेले असल्याने विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी, सिद्धांत सोप्या भाषेत समजावल्या होत्या.खूप उदाहरणे होती.या पुस्तकामुळे विज्ञानाची गोडी अगदी लहान वयातच निर्माण झाली आणि का? व कसे? यांचे समाधान लहान वयातच झाले. १९४०-५० च्या दशकात ते पुस्तक लिहिलेले होते. मराठी अनुवाद कुणी केला होता ते आता आठवत नाही पण हे पुस्तक मूळ इंग्रजी असेल अशी शंकाही न येण्याइतका सुरेख अनुवाद होता.      या पुस्तकात असलेल्या अनेक छोट्या कथांपैकी एक म्हणजे जॉनी ऍपलसीडची कथा.अठराव्या शतकाच्या सुमारास हा भटक्या एकहाती सफरचंदाचे बगीचे उभारत भटकायचा.डोक्यावर टीनाचे टोप आणि खांद्यावर एक काठीला टांगलेली सफरचंदाच्या बियांची पिशवी असे एक रेखाचित्रही होते. याने जेथे सफरचंदाच्या बागा ल

देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)

     काही वर्षांपूर्वी (जास्त दूर जायची गरज नाही, ३-४ च झाली असतील) ,नेमेची यायचा  क्रिकेट सिझन आणि नेमेची चर्चा व्हायची देवबाप्पाच्या निवृत्तीची. "शेर अब बुढ़ा हो गया हैं !"   थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. आता बघा ना ; २००६ ला  एक  बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत होता. आता मात्र कसे त्याचे दात त्याच्या घशात गेलेत. जखमांनी त्रासलेल्या सचिनला मानसिक आधार देण्याऐवजी हा 'सिक' बोका " मेरी बिल्ली मुझीसे म्याऊ" म्हण सार्थ करत होता .अरे , तुझ्या अवेळी संपलेल्या कारकिर्दीचे खापर सचिनच्या हेल्मेटवर कशाला फोडतोस ? त्याने तेव्हाच hellशी आपली meeting निश्चित केली! मग २००७ ला सचिनवर ऑस्ट्रेलियातून एक चप्पल भिरकावली गेली, "सचिनने आता निवृत्त व्हावे . तो आपल्याच खेळाची सावली बनलाय आता. " त्याच्या भावाने पण त्याच्या चपलेवर चप्पल ठेवत देवबाप्पाच्या प्रामाणिकतेवरच  शंका घेतली .अरे , तू कोचिंग करायचे पैसे घेतले होतेस कि टीम फोडण्याचे ? न्यूझीलंड विरुद्ध ८०-८१ मध्ये आपल्या भावाला underarm टाकायला लावून खिलाडूवृत्तीचे मस्त दर्शन घडवले होतेस !! किती म्हणू

केला होता करार जरी

केला होता  करार जरी मी, नियतीने कधीच पाळला नाही रात्रच अशी भयाण काळी होती, सूर्य देखील उगवला नाही दिवस नवा उजाडता, फक्त स्वप्नांचीच लक्तरे ढगांनीच नेहमी बरसावे, नियम बनला नाही हातावरच्या रेषा माझ्या,वळत्या हो कुणी केल्या मार्ग असा नागमोडी,सावलीपण सोबतीला नाही अस्वस्थ मनाचे हुंदके, सरणावरच अखेर थांबले अस्थी गोळा करायला, कुणीच कसा थांबला नाही पापण्या मिटल्या म्हणे, फक्त स्वप्नांच्याच ओझ्याने पण सूर्य निजलेला दिवसा, मला कधीच दिसला नाही

एन्दिरन स्तोत्र - ३

   -----भाग २ पासून पुढे ----                                                                          भाग १ इथे वाचा                    शांतीचा संदेश जरी चिट्टी  वदला । परी तो न कुणा पटला ॥ जगी कायदाच हा भला । निश्चीत असे ॥१०६ ॥ वसीगरनचा पारा चढला । चिट्टीसी घेऊनी आला ॥ बोल बहु  लाविला ।  रागाच्या भरात ॥१०७॥ प्रेम करण्याची केली याचना ।  आणिक जगू देण्याची याचना । परि वसी ऐकेचना । चिट्टीची विनंती ॥१०८॥ जग हे अमानुष खरे । प्रेम करणार्‍याला म्हणती भले-बुरे ।शरण न येती जोवरे । प्रेममार्गी ॥१०८॥ प्रेमाची ही न्यारी किमया । विरोध करते जरी दुनिया ।। प्रसंगी अपुला जीव देऊनिया । प्रेम अमर करती ॥१०९॥ चिट्टीच्या प्रेमाग्रहाने त्रासुनी । वसी आणिक ती तरुणी ।। थकुनि गेले समजावुनी । चिट्टीस त्या ॥११०॥ वसीने निर्वाणीचे निर्णय घ्रेतले । चिट्टीचे अंगविच्छेद केले ॥ मन गहिवरून जाते अपुले । दृष्य बघुनी ॥१११॥ अंग अंग वेगळे होतांना। प्रेमाचीच करी याचना ॥ विट्टीची ही वेदना । पाहवत नाही ॥११२॥ फ़ेकुनि देतो कचर्‍यात । अपुल्या हस्ते निर्मीत ।चिट्टीची ती गत । हेलावणारी ॥११३॥ चिट्टीचा हा अंत नसे खरा । दुष्ट तो ड

ग़ज़ल - कुछ ज़ख़्म हमारे ....

कुछ ज़ख़्म हमारे यूँ गहरे हो गये मरहम लगाया फिर भी हरे हो गये    दोस्त साथ ना दें तो कोई ग़म नहीं दुश्मन अब जाँ से भी प्यारे हो गये नाता तोड़ चुकें  बरसात से भी हम घर में आसुँओं के फ़वारे हो गये रेत के महल थे, ढह गये तो क्या ग़म सूरज की तपन के नज़ारें हो गये हिसाब भी क्या रखना बिती यादों का कुछ पल मेरे कुछ तुम्हारे हो गये तन्हाईयों से दूर भागते रहे ’संकेत’ अब उसी के सहारे हो गये

एन्दिरन स्तोत्र - २

------ भाग १ पासून पुढे ------ दोन विनोदी नर । जे चिट्टीला वारंवार ॥ करण्यासाठी बेजार । प्रयत्नरत ॥५२॥ परि चिट्टी नाही बधला । दोघां धडा  शिकविला ॥ तयांसी बेजार केला । मारूनी पैजारा ॥५३॥ पहा या घटनेतून । मनी घ्या ठासून ॥ कुणा विनोद करून । खिजवू नका ॥५४॥ ते सहकारी राहिले । म्हणून वसीने क्षमा केले ॥ दयाभाव दाखविले । त्या दोघांप्रत ॥५५॥ पहा वसीच्या चित्ती । आहे कणवाळू वृत्ती ॥ हीच खरी शक्ती । मानवाची ॥५६॥ आता चिट्टीच्या लीला । अनुभवी ती बाला ॥ अभ्यास तिज करविला । वैद्यकशास्त्राचा ॥५७॥ देवीच्या नामे गोंधळ । करती जन सकळ ॥ थांबविला तात्काळ । चिट्टीने बघा ॥५८॥ अभ्यास हा प्रथम । मग आले देव-धर्म ॥ हेची खरे मर्म । विद्यार्थ्यांचे ॥५९॥ इतरांना त्रास देउन । ध्वनीप्रदूषण करून ।। देवी ती प्रसन्न । होइल का ॥६०॥ इथे एक संदेश दिला । ध्वनीप्रदूषण करणार्‍याला । धडा शिकविला । देवीरूप दाखवून ॥६१॥ परीक्षा उत्तीर्ण करायला । मदतीचा हात दिला ॥ म्हणूनच ती बाला । उत्तीर्ण झाली ॥६२॥  चिट्टी खोटे नाही बोलला । मनुष्यस्वभाव हा भला ॥ कधीच न कळला । भावनाहीन चिट्टीस ॥६३ ॥ मग रेल्वेगाडीच्या करामती । त्या वर्णू मी किती

एन्दिरन स्तोत्र - १

श्री गणेशाय नम: हे पार्वतीनन्दन । अग्रपूजा तुझा मान ।। करितो तुज वन्दन । स्वामी संकेतानन्द ।।१॥ व्यासा बुद्धी तुच दिली । तयाची लेखणी चालविली ।। म्हणूनच त्याने निर्मीली । महाभारत काव्यरचना ।।२।। आता तुज वन्दून । स्तोत्र करितो लेखण ॥ जयाचे नाव एन्दिरन । चित्रपट असे ॥३॥ श्री रजनीकांताय नमः हे देवा रजनीकांता । हे साक्षात अरिहंता ॥ करितो दूर चिंता । अपुल्या भक्तांची ॥४॥ वर्णू मी किती । अशी तव महती॥ तुझीच असे भीती । दुष्टांना ॥५॥ तू हात ठेविला ।तत्त्क्षणी उद्धार झाला ।। महिमा प्रत्ययाला । आला असे ॥६॥ तूच महामेरू । तूच कल्पतरू ॥ दुबळ्यांचा आधारू । तूची असे ॥७॥ तुझिया सिनेमाद्वारे । रजनीभक्तीचे भिनले वारे ॥ तूच तूच  कैवारे ।  आता मज ॥८॥ आता हे रजनीदेवा। तुझा करितो धावा॥ सामर्थ्य मज द्यावा । स्तवनासाठी ॥९॥ तुझा मी भक्त साचा । उदो उदो रजनीनामाचा ॥ mind it मंत्राचा । गजर असो ॥१०॥ तुझी ती संवादफेक । आणि नजर भेदक ॥ धूम्रदंडिका सूचक । तुझ्या ओठी ॥११॥ हे  देवा रजनी । असतो निशदिनी ॥  तुझ्याच चरणी । स्वमी संकेतानन्द ॥१२॥ न दवडिता वेळ । न लावता पाल्हाळ ॥ वर्णितो सकळ । एन्दिरन अवतार ॥१३॥ आले रजनीदेव ।

श्वेतसुमनांसाठी......

   हे गीत आहे, युद्धात होरपळल्या जाणार्‍य़ा मुलांसाठी. युद्ध होतात, कुणाच्या राजकीय फायद्यासाठी, कुणाच्या खोट्या अस्मितेच्या नावावर. मात्र एक पिढी गुदमरली जाते. युद्धग्रस्त भागात बघा, मुलांना त्यांचे बालपण सुद्धा उपभोगता येत नाही. काश्मिरातल्या मुलांचे बालपण ते काय असणार, AK-47 च्या सावलीत जाणारं! गोळीबाराचा आवाज हेच त्यांचे अंगाईगीत."आज कर्फ्यू है " हे त्यांचे बोबडे बोल. त्यांचे बालपण हरवत असते. आणि आपण "युद्धस्य कथा रम्य" म्हणत असतो. सगळ्या युद्धग्रस्त भागात थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते.         महान तमिळ गीतकार/कवी वैरामुथु यांनी हे गीत "कण्णत्तील मुत्तमिटाल "  या मणीरत्नम यांच्या चित्रपटासाठी लिहीले. तमिळ वाघांच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर एका मुलीच्या भावविश्वाचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. संगीत रहमान सरांचे आहे.हे गाणे त्यांनीच गायले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांकरता दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. मला हे गाणे खूप आवडते म्हणून मी मराठी अनुवाद करायला घेतला. अगदीच शब्दशः नाही.वैरामुथु सरांना अभिप्रेत असलेल्या भावना पकडण्याचा प्रयत्न केलाय. तमिऴ अ

काय लिहू आज...

काय लिहू आज... एक शनिवार कंटाळवाणा .... कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या.. खरं तर साधा प्रयत्नही  नाही केला... पराभव हा माझाच, लाजीरवाणा .. कित्येक  बघितलेली स्वप्नं... स्वप्नातच विरलेली... दिवस  उजाडताच  नवा ... माझी तीच वाट, अंधारलेली ... एक काळ असा येईल.. माझ्या स्वप्नाप्रमाणे घडेल.. माझी ताकद  मलाच कळेल .. पण तोही..कदाचित स्वप्नातच.. काय लिहू आज ..मी  दुर्मुखलेला. खरडल्या चार ओळीच.. मनस्थिती निराशलेलीच... थांबतो इथेच.. मी कंटाळलेला ..

सार्वजनिक रजनीकांतोत्सव

          आज १२ डिसेंबर, ३०१०. भल्या पहाटे उठून रजनीदेवाजी आराधना करून सहज फेरफटका मारायला बाहेर पडलो. रजनीकांत चौकात आल्यावर एका मोठ्या फलकाने स्वागत केले, " अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळ तर्फे आयोजित सार्वजनिक रजनीकांतोत्सव आपल्या हजाराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ." तो फलक वाचताक्षणीच " स्वामी  संकेतानंद कृत रजनीकांतायण" या प्राचीन महाकाव्याची "MIND IT मित्र मंडळ"  हा अध्याय डोळ्यासमोर तरळला. भावनावेग अनावर होऊन डोळयातून हर्षधारा वाहू लागल्या. शरीर रोमांचित झाले. रजनीकॄपेने आजही "MIND IT मित्र मंडळ" त्याच पद्धतीने सार्वजनिक रजनीकांतोत्सव साजरा करत आहे.एवढेच नव्हे तर हा उत्सव आता संपूर्ण विश्वात सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक साजरा करतात. या सणाने जगभरातील भेदभाव कामयचा नष्ट केलाय.          आता घरी आल्यावर माझ्या संग्रहात असलेले "सार्वजनिक रजनीकांतोत्सव" ची प्रथम घोषणा करणारे ऎतिहासिक पत्रक वाचायला काढले. हजार वर्षं जुने असलेले हे पत्रक आपल्या दर्शनासाठी प्रकाशित करतोय.                                          

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - २

        जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते.लुंगीनगर त्याचे नाव.त्या नगरात एक बस वाहक राहायचा. सगळे त्याला चिदूअण्णा म्हणायचे. खाकी सदरा, खाली पांढरी शुभ्र सुती लुंगी, गळ्यात बांधलेला लाल रुमाल, डोळ्यांवर चढवलेला काळा गॉगल ही त्याची वेशभुषा होती.तो रजनीदेवाचा भक्त होता. तो त्याच्या व्यवसायात आनंदी होता. पण त्याला सुटे पैसे परत मागणार्‍या प्रवाशांचा फार त्रास होता.त्यांच्यासोबत वाद घालतांना प्रकरण कसे निस्तरावे कळेनासे झाले होते. त्याचा हिशोब बरोबर लागत नसे. सुट्या पैशांची कमतरता त्याला हैरान करी. प्रवासी पण त्याचे ऎकेनात.        एके दिवशी त्याला एका सहकार्‍याकडून "१२ रजनीचित्रपट व्रताची" माहिती झाली. सहकार्‍याने सांगितले की, हा व्रत केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग त्याने व्रताची विधी समजावून सांगितली. सोबतच त्याला एक चेतावनी दिली की, हा व्रत मनोभावे पूर्ण कर, देवाजींना विसरू नकोस. " उतू नको, मातू नको, घेतलेली dvd टाकू नको. " इतके बोलून सहकारी आपल्या मार्गाला लागला.       चिदूअण्णाने ठरवले की, आपण हा व्रत करायचा. १२ जुलै ला त्याने व्रताला प्रारंभ केला. तो