पोस्ट्स

2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महानगर

मी जिथे राहतो ते एक महानगर आहे.. इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत.. इथली परिमाणं वेगळी आहेत.. इथे उंची ब्रॅंड्स मध्ये मोजली जाते  आणि श्रीमंती, स्क्वेअर फूट मध्ये.. खोली लक्षात येते सरकारी कचेऱ्यांत.. आणि झेप, मिळणार्‍या पॅकेजमध्ये.. इथे व्यक्तीस्वातंत्र्य लक्तरांमध्ये मिरवतं.. कधी फसफसतं  आणि मग फुटपाथवर हसतं. इथल्या रात्री आगळ्या आहेत.. काही अंग थिरकत असतात आणि काही कुडकुडत असतात.. काही पाय लटपटत असतात.. आणि काही लगबगत असतात.. काही हात शिवशिवत असतात.. आणि काही विनवणत असतात. इथले दिवससुद्धा गमतीदार आहेत. सकाळ झाली रे झाली.. की  रस्त्यांवर घड्याळे धावतात... सिग्नलवर थांबलेली घड्याळे.. लाल दिव्याखालच्या आकड्यागणिक कॅल्कुलेटरमध्ये बदलतात.. एखादा कॅल्कुलेटर घाईघाईत घड्याळ बनतो.. मग एखादी घड्याळ अचानक बंद पडते, कायमची.. काळ-काम-वेगाचे गणित सोडवतांना.. माणूस कधी वजा केला जातो, कळतंच नाही.. इथे गुलामगिरी आहे.. गगनचुंबी इमारती, मॉल्स आणि झगमगते रस्ते म्हणजे सावज हेरायला बनवलेला आधुनिक सापळा आहे.. घंटांची किणकि

द ग्रीन फ़्लाय

            तो म्हातारा शेतकरी गावातला सर्वात श्रीमंत माणूस, अगदी आजारी, मृत्युच्या दारी उभा होता.देवाच्या दरबारी त्याचा न्यायनिवाडा केला जात होता, त्याच्याकडे बोट दाखवून देवाने सार्‍या मानवजातीला उदाहरण दिले : " जॉन गॅलकडे बघा. तुम्ही मर्त्य जीव समजता काय स्वतःला ? तुम्ही खिजगणतीलासुद्धा नाहीत. आता, जॉन गॅल खरंच कोणीतरी आहे. जिल्ह्याचा न्यायाधीशसुद्धा त्याची भेट घेतो वेळप्रसंगी. गावच्या पाटलीणबाई येतात आणि त्याची भेट घेतात. तो सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे.तरी मी त्याच्यावर आघात करू शकतो.त्यासाठी मला एखादा भुकेला लांडगा पाठवायची गरज नाही की, एखादा मोठा देवदार त्याच्यावर पाडून त्याला चिरडून टाकायची पण गरज नाही. एक छोटी माशी पुरेशी आहे. " अगदी हेच घडले होते. एक माशी त्याच्या हाताला चावली. हाताला सूज येऊ लागली आणि त्याचे हात अधिकाधिक लाल-काळे होऊ लागले. पुजार्‍याने आणि पाटलीणबाईंनी त्याला डॉक्टरला बोलवायला सांगितले. एखादा साधा शल्यचिकित्सक बोलावणे त्यालासुद्धा चालणारे होते, पण ती मंडळी बुडापेस्टला तार करून विशेष‍ज्ञाला बोलावण्याचा आग्रह करत होती. डॉ. बिर्लींची निवड झाली.

त्रिवेणी (हिंदी ) -- क्र. १-४

त्रिवेणी क्र. १ >>> बारिश की बुंदे भी कितनी बेईमान होती है. बस कुछ लम्हो की यहाँ मेहमान होती है.. . . . . ये आंसू मुझसे बेईमान क्यू नही होते ??       पुणे, ६ मार्च, २०११  -------------------------------------------------------------------------------- त्रिवेणी क्र. २ >>> कहते हैं आदमी पढेगा, तो उन्नत होगा, विचारों का दायरा बढेगा.. सोच बदलेगी, सरहदें मिटेगी, दिल-से-दिल मिलेंगे.. . . . . . . हम तो अब फेसबुक पर भी ग्रुप्स में जीने लगे हैं -------------------------------------------------------------------------------- त्रिवेणी क्र. ३ >>> आज पापा घर जरा देर से पहुँचे.. मोबाइल का नेटवर्क जॅम था.. . . . . . वजह वोही थी, बस 'तारीख' नयी थी -------------------------------------------------------------------------------- त्रिवेणी क्र. ४  >>> एक ही गाडी  में बैठे  हम दोनों , मंजिल की तरफ बढ़ रहे थे.. और बंद खिड़की के बाहर खुबसूरत नजारों का सिलसिला चला. . . . . .

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!     वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.       तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की तेव्हा जिकडे तिकडे रजनीभक्ती

जी हाँ, मै एक आम आदमी हूँ..

जी हाँ, मैं एक आम आदमी हूँ अब आपको पता चल गया होगा देख के ताकद मेरे आवाज़ की अब आपका दिल जल गया होगा जी हाँ, मैं वो ही आम आदमी हूँ जो कल तक डरता-सहमता था हालात पे रोता, रोज मर के जीता था जिसकी आवाज़ सैकडों बार दबायी गई और हजारों बार जो छल गया होगा जी हाँ, मैं वो ही आम आदमी हूँ आपके घोषणापत्र में  जिसका चेहरा हैं आपके हर चुनाव में जो एक मोहरा हैं आज  मैंने भी अपनी एक चाल चली तो  आपका शतरंज हिल गया होगा जी हाँ, मैं एक आम आदमी  हूँ मैं प्रजातंत्र को बनाने वाली प्रजा  हूँ आप नहीं श्रीमान, मैं यहाँ का राजा हूँ आज मैंने अपना सिंहासन माँगा हैं तो आपका अभिमान ढल गया होगा जी हाँ, मैं एक आम आदमी  हूँ और मैं जानता हूँ ये देश मेरा हैं मुझसे ही नवनिर्माण का सबेरा हैं आप इस सूरज को छुपा नहीं सकते कोशिश में आपका हाथ जल गया होगा.. जी हाँ, मै एक आम आदमी हूँ अब आपको पता चल गया होगा.. देख के ताकद मेरे आवाज़ की अब आपका  दिल  जल गया होगा..        -- बेंगलुरू,                २७ अगस्त, २०११

अलविदा....

              कॉलेजचे शेवटचे सत्र (मराठीत ’सेमिस्टर’) म्हणजे जरा भावनिकच असते. कॅम्पसमध्ये एकंदरित धमाल असतेच. प्लेसमेंटची गडबड, प्रोजेक्टचे टेन्शन, शेवटचे वर्ष म्हणून आसमंत भरून मस्ती करायची उर्मी, आणि या सगळ्यांचा जोडीला एक हळवेपणाची किनारदेखील असते.. "हे दिवस आता परत येणार  नाहीत " ह्याची पुरेपुर जाणीव असते; आणि त्यात हा "फ़ेअरवेल " नावाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार असतो.. जर एखादा दगड या फ़ेअरवेलला आला तर त्याच्या आतूनसुद्धा अश्रूंचे कारंजे फ़ुटतील.. फ़ायनल ईअरच्या पोरांनी रडलेच पाहिजे अशी तजवीज हे ज्युनिअर लेकाचे या फ़ेअरवेलचे कार्यक्रम आखतांना करतात.       अस्मादिकसुद्धा कधी काळी कॉलेजला गेलेले. अस्मादिकांना त्यांच्या ज्युनिअर्सनी फ़ेअरवेल दिलेला; आणि अस्मादिक खबरदारीचा उपाय म्हणून खिशात २-२ हॅंकीज(रुमाली हो !) घेऊन गेलेले, पण मरण कुणाला चुकतंय हो ?         अजूनही तो दिवस आठवला की मन हळवे होते. फ़ेअरवेलचा दिवस होता म्हणून आमच्या ज्युनिअर्सनी आम्हाला वाट्टेल ते करण्याचे स्वातंत्र्य दिलेले..मग काय, उधळलो आम्ही.. एकदा तरी सार्वजनिक स्थळी, चार लोकांत आपला गळा स

मैं गीत क्यूँ गाऊँ ?

गिद्धों के झुण्ड आते हैं जीवित देह नोंच चले जाते हैं आँखे बंद कर हम जी लेते हैं एक पत्थर भी ना उठा पाऊँ मैं गीत क्यूँ गाऊँ ? क्रुद्ध पवन रोज बहता हैं बेघर करता हैं, तन जलाता हैं ना ये मन हमारा व्यथित होता हैं एक नीड़ भी ना बना पाऊँ मैं गीत क्यूँ गाऊँ ? तिमिर यहाँ प्रतिपल होता हैं सूर्य पर विकट हँसता हैं हम भी तिमिर के साथ हो लेते हैं एक दीपक भी ना जला पाऊँ मैं गीत क्यूँ गाऊँ? बेरंग जगत के रंगरेज़ लोग मुखौटा पहने चालबाज़ लोग एक मुखौटा मैं भी पहना हूँ यह भी तो ना उतार पाऊँ मैं गीत क्यूँ गाऊँ ? खौफ़ के साये में रोज जीते लोग घर लौटे तो दीवाली मनाते लोग आज थोडा हँस के जी लेता हूँ क्या पता कल घर आ ना पाऊँ मैं गीत क्यूँ गाऊँ? ---- पुणे - ०३-०३-११ , बंगलोर - ०१-०५-११ ; १४-०७-११

विडंबन - सांग सांग भोलानाथ

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही  कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय.  सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ? प्रोजेक्ट कचर्‍यात जाऊन, रिलीज मिळेल काय ? भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ? माझे काम स्वतः उरी घेईल काय ? भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा  आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ?  भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग.. सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ? भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ? ३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ? भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ? भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ? एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्‍या स्वरात भोलानाथला म्हणाले, " भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?  भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? " आकाशवाणी झाली, " भगवान के घर देर हैं, अंधेर नही..

अंतहीन...

अलविदा म्हणताना... वेदना अंतहीन.. 'क्षण' दोन क्षणांचा.. हुरहूर अंतहीन.. नुसतेच कसे गिळावे.. हुंदके कंठातले.... हसरे डोळे जरी.. आसवे अंतहीन.. पाठमोरी आकृती  ठिपका होतांना.. परिघात अडकले.. जीवन अंतहीन.. तू असलास जरी.. परक्या बाहुपाशात.. तुझाच मजला... आधार अंतहीन.. नजरानजर क्षणाची.. मन रे अडकले.. तो विसरायाची.. साधना अंतहीन.. मोहाच्या चांदराती.. बेसावध चांदण्या.. फसव्या स्वप्नांचा  पाठलाग अंतहीन.. आज पुन्हा एकदा.. एकांताची साथ.. विस्कटलेल्या बिछान्याचे. भास अंतहीन.. तुटता तुटेना.. ताण अंतहीन.. सुटता सुटेना.. प्राण अंतहीन.. येऊ दे ते .. मरण अंतहीन.. जळू दे ते.. सरण अंतहीन..