पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये ज़मीं हैं सितारों की

हम कहें क्या कहानी अजी , बदगुमाँ इन बयारों की जब समझ ही न पाए ज़ुबां, आज भी यह इशारों की चंद बूँदें लहू की गई , तो क़यामत नहीं आई तलब तो मिटेगी सही, कुछ लहू के बिमारों की अब यहाँ जिस्म तो बिक गया, मोल तो हो अनाजों का  ये कहानी नहीं काफिरों , हैं हकीकत बज़ारों की बख्श दो फिसल जो हम गए, आपकी आशिकी में यूँ कुछ खता तो हमारी रही, कुछ रही इन बहारों की आज अखबार पढ़ के मुझे, ये पता तो चला यारों ये नहीं अब हमारी रही, ये ज़मीं हैं सितारों की 

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

इमेज
पृथ्वीची तिरडी (एरव्ही परडी फुलांनी भरली !) जळो देवा,भली !! ...कविता संपली आणि वर्गात शांतात पसरली. 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेचे वर्गात वाचन सुरु होते. बारावीला सगळे विषय केवळ गुणांच्या आकडेमोडीत अभ्यासले जातात. मराठी काही अपवाद नव्हे, त्यामुळे अभ्यासक्रमाला असलेल्या कवितादेखील परीक्षेनंतर लक्षात राहत नाही की मनावर परिणाम सोडत नाही. या कवितेबाबत मात्र काही वेगळे घडले. मर्ढेकर या कवीचे 'नव्याने' ओळख झाली. बाळ सीताराम मर्ढेकर नावाच्या जादूची ओळख झाली ती त्यांच्या 'गणपत वाणी बिडी पितांना' ह्या कवितेतून. पुढे अजून एक कविता वाचनात आली, ' पिपांत मेले ओल्या उंदीर'. ह्या दोन्ही कविता शाळकरी पोरवयात वाचलेल्या होत्या. तेव्हा 'आधुनिक कविता' वगैरेंची फारशी मैत्री नव्हती, बालकवी,केशवसुत, कवी बी, ह्यांच्यापलीकडे झेप घेतली नव्हती. त्यामुळे ह्या दोन्ही कविता मला कितपत कळल्या होत्या ठाऊक नाही.फार भारावून जाणे अशातला प्रकार घडला नव्हता. शाळेला पाठ्यक्रमात मर्ढेकरांची पहिल्यांदा कविता अभ्यासाला आली, 'पितात सारे गोड हिवाळा'. मुंबईच्या हिवाळ्यातील पहाटेचे

स्वामींचे अभंग -१

  आयटीचे अभंग     क्युबिकली दिन । कंटाळवाणा सारा ॥ कामाचा भारा । रोजचाच ॥ कीबोर्डवरी नुस्ती । बोटे चालली ॥ रात्र विझली । कामापायी ॥ आयटीत गेला । गुदमरून जीव ॥ कोणा नाही कीव । स्वामी म्हणे॥     कळपाचा मेंढर । तैसा मी चाललो ॥ रुततच गेलो । गाळात या॥ स्वतंत्र प्रज्ञा । विझुनिया गेली ॥  निर्बुद्ध हमाली । केली सारी ॥ आता गा देवा । करावी सुटका ॥ झालो मी फाटका । स्वामी म्हणे॥    

श्रावणमासी हर्ष-मानसी

माझ्या लाडक्या कवींच्या, बालकवींच्या ’श्रावणमासि हर्ष मानसी’ या माझ्या आवडत्या कवितेचे हे विडंबन त्यांची क्षमा मागूनच सादर करत आहे. श्रावणमासी हर्ष-मानसी, फिरायला जाती सिंहगडी रुटीन चूकवून,बाईक दामटून,वाट करती वाकडी विकेंड बघता ओघ गाड्यांचा गडावरी चाललासे जत्रा भरली काय गडावरी, क्षणोक्षणी मज भासे झालासा सूर्यास्त वाटतो, क्यामेरा त्वरेने तो काढे तानाजी कड्यावर पोज दिली, फ़ोटो काढा ना गडे उठती वरती जलदांकडे पाहण्यास वेळ नसे सर्व प्रेयसीवर होय रोखिले क्यामेर्‍याची लेन्से दुकानमाला दिसता भासे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे चढूनि येती गडावरती, खादाडीस की एकमते कचरा करूनि प्लास्टिकचा गडावरी वावरती सुंदर ललना हिरव्या कुरणी मित्रासंगे बागडती पार्ट्याही होती रानी, डीजे आसमंती घुमे फ़ेसाळ पेला बोले, हवी कशाला परमिट रुमे व्हिस्की कॅन उघडला विपिनी,धुंद गंध दरवळला बघता तिथे पोलिसमामा, मन अति कळवळला महागडी गाडी घेऊन साथी घाटावरूनि चढती आले मनी, निघाले झणी,गोंधळ घालाया वरती गडदर्शना निघती ललना, हर्ष येई कराया क्लिक वॉलवर त्यांच्या बघून घ्यावे, श्रावण महिन्याचे ’पिक’ ---पुणे, २ ऑग

पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो, विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोक

ठाकुरांची (आणि माझीही) कृष्णकलि

इमेज
बंगाली गीतांमध्ये रुचि घेणे सुरु केले तेव्हाची गोष्ट आहे. आबोहोमान चित्रपटातल्या ’For your eyes only ’ गाण्याबद्दल एका बंगाली फ़ोरमवर वाचले नि ते यूट्य़ूबवर ऐकले. त्या गाण्यात रबिंद्रनाथ ठाकूरांच्या ’कृष्णकलि’ आणि जीबोनानन्दो दासांच्या ’बोनोलता सेन’ ( पुढचा लेख हिच्यावरच आहे. ) ह्या दोन काव्यकन्यांचा उल्लेख येतो.  ही मयनापाड्याची मृगनयनी कृष्णकलि कोण असावी हे कुतूहल तेव्हापासूनचे. कृष्णकलि  यूट्य़ूबवर सहज सापडली आणि मी हिच्या प्रेमातच पडलो. आता ही ठाकूरांची न राह्ता माझीही झाली होती. जिंवत चित्रण करणारे काव्य आणि तेही सहजसोप्या भाषेत कसे असावे ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे ’कृष्णकलि’. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. सुमारे ११० वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता अगदी क्रांतिकारी विचारसुद्धा घेऊन आली आहे. कवी एका काळ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र तो तिच्या काळ्या रंगाकडे न बघता फक्त काळ्या, हरिणीसारख्या डोळ्यांकडे बघत आहे. तसेच काळ्या रंगांचे  आणि आनंदाच्या भारतीय संकेतांचे अद्वैत दाखवून तो म्हणतो की  तुम्हाला तिला जे म्हणायचे असेल ते म्हणा, मी तर तिला कृष्णकलिच ( एका प्रकारचे फूल )

सालगिरह

हर बरस सालगिरह पर यूँ ही हँसते हँसते हर कोई उम्र में इक साल बढ़ा लेता है वक़्त एक सेंध लगाता हुआ आहिस्ता से उम्र के पेड़ से एक शाख चुरा लेता है वक़्त के अपार इतिहास में झाँको तो ज़रा कहाँ वर्तमान, कहाँ भूत, कहाँ भविष्य है उम्र बढ़ती नहीं घटती हैं, हर एक साल के बाद वक़्त आगे नहीं पीछे की तरफ़ चलता है वक़्त आज़ाद परिन्दा हैं, ये अमर है आज तक ये किसी ज़ंजीर से जकड़ा न गया तर्क और भावनाओं की सब कोशिशें नाकाम रहीं ये परिन्दा किसी शिकारी से पकड़ा न गया ज़िन्दगी तो ग़मों की किताब हैं दोस्त साल के बाद पन्ना जिसका उलट जाता है पढ़ चुके कितना इसे, बाक़ी बची है कितनी ऐसा सोचा तो दिल आँखों में सिमट आता है मौत का ज़िक्र भयानक है, मगर आज के दिन, उल्टी लटकी हुई तसवीर को कुछ सीधा करें फ़िक्र और  अहसास की इक और बुलन्दी छूकर आओ, कुछ देर तक माहौल को गंभीर करें..... !! -- मैंने मूल उर्दू नज़्म का हिंदुस्तानी(हिंदी+उर्दू, बोलचाल की भाषा) में अनुवाद किया है. कवी का नाम तो पता नहीं, लेकिन इतनी खूबसूरत नज़्म लिखने के लिए उन्हें शुक्रिया ज़रूर कहूँगा..

वही

जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत... काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता.. वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता.. कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत.. काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे गुपित... थोडे शब्द बापुडे चिंब ओले आठवणींत.. काही भावना कोसळत्या जलप्रपातात ... होते काही मौक्तिकबिंदू गळालेले कातरवेळी... होती चाहूल लागलेली  कुणाची वेळी - अवेळी.. एक प्रयत्न उधाण वारा कवटाळण्याचा.. नि होता एक  प्रयत्न आसमंत गवसण्याचा होते काही क्षण रेंगाळलेले उंबर्‍यावर एक पिंपळपान भरकटलेले वार्‍यावर चाळता ती पाने  जाणीव झाली मजला.. संसार माझा स्वप्नांच्या सरणावरी  सजला.. वही जाळली मी आज माझ्या  स्वप्नांसहित ....

जी ढूँढता हैं....

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... हिवाळ्यात कोवळ्या उन्हात.. अंगणात बसून चटईवर... बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे मग उग्गाच थोडे लोळणे.. आईने केस विंचरून दिले की.. शाळेला पळत सुटणे दप्तर टाकून पाठीवर.. जी ढूँढता हैं फिर वोही... उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी.. छपरांतून डोकावणारे कवडसे.. ते कासव टाकीतले इवलेसे.. किती गार गार वाटायचं.. हात लावलं त्याला की ते बेटं अंग चोरायचं.. तळाला जाऊन लपत असे.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळ्यात डबक्यात.. शाईची कलाकारी.. भेपकी उडवणे.. अन्‌ ’त्या’ तळ्यात माझा पाय ’खपणे’... उधाणलेल्या वार्‍यात फिरवलेली चकरी.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळी नदीतल्या कागदी होड्या.. भिंतीवरून मारलेल्या रेतीत उड्या.. कैर्‍या तोडणे..लाखोळी चोरणे.. गुरांच्या मागे धावत जाणे.. टोपलं घेऊन शेण गोळा करणे.. चाक ’पजवत’ गावात भटकणे अन्‌ भातुकलीत राजा-राणीच्या जोड्या.. जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... - १८ एप्रिल, २०१२ ,  पुणे 

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया

सुर्ख होते सबेरे जैसे जलते अँगारे मायूसी की दीवारें बिखर जाती हैं खुशियाँ ज़िन्दगी गाती हैं मर्सिया शब्दों की सिलवटें नज़्मों की कराहटें दिल-धड़कन झूटे झूटे हैरत में हैं काफिया ज़िन्दगी गाती हैं मर्सिया सपनों का आँगन मर गया यौवन सुखा भादो सुखा सावन बैसाख जैसे हैं सदियाँ ज़िन्दगी गाती हैं मर्सिया   मैं जो हूँ तर-बतर शबो-सहर,आठों पहर अश्के-दिल या खूने-जिगर अपनी अपनी हैं कहानियाँ   ज़िन्दगी गाती हैं मर्सिया जिस्म के ताबूतों में बेजान बुतों में   दिखावटी रुतों में रूहों की हैं परछाइयां ज़िन्दगी गाती हैं मर्सिया उम्मीदों का मर्सिया सपनों का मर्सिया रिश्तों-नातों का मर्सिया हर लम्हा हैं मर्सिया ज़िन्दगी गाती हैं मर्सिया

काही चारोळ्या - १

कधी काळी सहजच लिहील्या गेलेल्या ह्या चारोळ्या... पहिली वगळता इतर सर्व बझ्झवर टाकल्या होत्या.  १ ) त्याचे नशीब माझे असते तर बरे झाले असते दगडावरची रेघ खोडणे एवढे पण सोपे नसते   २) तुझ्या त्या आठवणी, तुझे ते भास.. रखरखत्या वाळवंटी , मृगजळाचे आभास.. कधी दचकून उठावे, रात्री अवचितच.. तूच निजलीस शेजारी, खोटा ठरतो विश्वास..   ३) सावध असतो मी , आता स्वप्न बघतांना  स्वप्नातली तू , काल प्रत्यक्षात दिसलीस.... माझ्या बंद पापण्यांच्या कैदेतून गं तू  कशी काय फरार झालीस ?   ४) सारेच बंध तोडून ये.. अशी धाव सैरभैर ये.. रातीला कवेत घेतो मी.. चांदण्यांना लपेटून ये..   ५) काळोखाच्या सावलीत... उदास कुजबूज... काजव्यांच्या ओठी.. चांदण्यांचे गुज..    ६) रक्तिम क्षितिजावर.... स्वप्न उदयास आले.. पंखातील चैतन्य.. आसमंत झाले...  

निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’

इमेज
आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?    रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात. " कान पेतेछी, चोख मेलेछी, धॉरार बुके, प्राण ढेलेछी जानार माझे ओजानार कोरेछी शोंधान " एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध.. या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार.                आधी मूळ बांग्ला गीत : आकाश भॉरा शूर्जो तारा बिश्शो भॉरा प्रान ताहारी मा